फडणवीस घायाळ ! शिवसेनेचे जळगावात 'सर्जिकल स्ट्राईक'

जळगाव : गिरीष महाजनांचा राजकीय पराभव करून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच 'दे धक्काा' देण्यासाठी शिवसेनेने जळगावमध्ये 'सांगली पॅटर्न' स्टाईल राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक' केले आहे. जळगाव महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्शवभूमीवर 27 नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहेेेत. 

हे २७ शिवसेनेच्या गोटात सामील होणार आहेत. यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भाजपला जबर धक्का बसणार आहे. या रणनीतीतून शिवसेनेने फडणवीसांचे उटे काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

'ते' २७ नगरसेवक सेनेच्या गोटात दाखल ?

जळगाव महापालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक येत्या 18 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच 27 नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्ताधारी भाजपला सुरूंग लावला आहे. 'ते' सर्व 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याची चर्चा आहे. अशा प्रकारे महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपचे बहुमत शिवसेनेने राजकीय सर्जीकल स्ट्राईक करत उद्धवस्त केले आहे. 

जळगाव महापालिकेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत्य विश्वासू सहकारी आणि राज्य भाजपचे संकटमोचक हनुमान म्हणून ज्यांची ओळख आहे असे गिरीष महाजन यांच्यावर आहे. त्यामुळे सेनेचे हे सर्जिकल स्ट्राईक फडणवीसांच्या चांगलेच जिव्हारी लागणार, असे दिसते. 

जैन-खडसे धक्कातंत्र

57 सदस्य असलेल्या भाजपकडे महापौरपद आहे. नव्या महापौरांच्या निवडीच्या पार्शवभूमीवर भाजपचे अनेक बंडखोर नगरसेवकांनी सोमवारी मुंबई गाठली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सुरेश दादा जैन यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. हे नगरसेवक सेनेच्या गटात गेले तर शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होईल. भाजपला धक्का देण्यासाठी राजकारणातील कट्टर विरोधक असलेले एकनाथ खडसे आणि सुरेश जैन एकत्र येत असल्याचे हे संकेत आहेत. या दोन शक्ती एकत्र झाल्यास आगामी जिल्हापरिषद, महापालिका आणि भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी हे मोठे आव्हान ठरण्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. 

महाजनांनी तोडफोड केली पण... 

जळगाव जिल्ह्यात तोडफोडीच्या राजकारणात गिरीश महाजन यांनी गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सत्ता आणली. भाजपने महापालिकेत सत्ता आणली खरी, पण राज्यात भाजपने सत्ता गमावली. गेल्या वर्षभरात केंद्राचा पैसा वगळता कुठलाही निधी जळगाव महापालिकेला मिळाला नाही. 

अशा परिस्थितीत अनेक नगरसेवक बेचैन झाले. भाजपात राहून निधी मिळू शकत नसल्याने अनेक नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गळाला लागले. अखेर आता भाजपच्या ताब्यातून महापालिका जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !