अहमदनगर : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे दिल्लीत निधन झाले आहे. तब्येतीची तक्रार जाणवल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
माजी खासदार गांधी यांना अचानक तब्येतीची तक्रार जाणवल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यात त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांचे दिल्लीत निधन झाले.
अहमदनगर दक्षिणमधून तीन वेळा प्रतिनिधित्व करताना खासदार म्हणून दिल्लीच्या संसद भवनात गेले होते. केंद्रीयमंत्रीपदीही त्यांची वर्णी लागली होती. त्यांच्या निधनाने भाजपची मोठी हानी झाली आहे. अहमदनगरच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.