आत्महत्येचा इशारा ! बँकेचे मार्च एंडिंगचे 'टार्गेट' शेतकऱ्याच्या मुळावर, काय आहे प्रकरण...

कर्ज माफीसाठी पात्र शेतकऱ्याच्या उसाच्या पेमेन्टमधून कॅनरा बँकेची परस्पर कर्ज वसुली

शेवगाव - कर्जमाफीसाठी पात्र असतानाही उसाचे जमा झालेल्या पेमेंटमधून कॅनरा बँकेच्या वसुली विभागाने परस्पर कर्जाची रक्कम वसूल करून आपल्यावर अन्याय केल्याची तक्रार अंबादास श्रीधर भागवत यांनी केली आहे. ते शेवगाव ( जिल्हा- अहमदनगर) तालुक्यातील समसूद एरंडगाव मधील रहिवासी असून गावातील कॅनरा बँकेत त्यांचे खाते आहे. 

बँकेच्या या आडमुठे धोरणाचा निषेध करून आपल्याला त्वरित न्याय मिळावा आणि महात्मा फुले कर्जमुक्तीच्या आधारे माझे कर्ज शासनाकडून माफीच्या प्रक्रियेत बँकेने राबवून घ्यावे, अन्यथा मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

कोरोना आणि अतिवृष्टीने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याची बँकेकडून आर्थिक अडवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. उसाचे पेमेंट सध्या बँकेत जमा होत असून बँकेचा कर्ज वसुली विभाग त्यावर डोळा ठेऊन बसला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जून महिन्यात शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफीसाठी पात्र झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला. 

मात्र प्रत्यक्षात कर्जाचा बोजा आहे तसाच राहिला, अशी परिस्थिती आहे. त्यात मार्च एंडिंगचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी बँकांकडून उसाच्या पेमेन्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे प्रकार घडत आहेत. मग, या शेतकऱयांनी जगायचे कसे असा, संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण...

तक्रार अर्जात भागवत यांनी म्हटले आहे, की माझे गट नंबर ३३ / ४ याचे ऊसाचे आलेले पेमेंट बँकैने परस्पर माझ्या खात्यातून कापून घेतले आहे. १९ जून २०२० रोजीच माझ्या मोबाईल वर कर्जमाफीचा मेसेज आलेला असतानाही कॅनरा बँकेने माझ्या खात्यातून ऊसाचे पेमेंटमधून पैसे माझ्या परवानगीशिवाय परस्पर कापून घेतले के, असा माझा सवाल आहे. 

याशिवाय मी शेतीसाठी बऱ्याच जणांकडून उसनवारी पैसे घेतले आहेत. मात्र, माझ्याकडे त्यांना देण्यासाठी पैसे देण्यासाठी नाहीत. त्यामुळे माझी बँकेने केलेली ही फसवणूक माझ्या जीवावरबेतणार आहे. बैकने माझे पेसे परत मला दिले नाहीत तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. याची दखल घेऊन मला योग्य तो न्याय बँक प्रशासनाने द्यावा. 

कर्जमाफी झाली पण...

"माझ्या मोबाईल वर महात्मा फुले कर्जमाफीचा मेसेज आलेला आहे तरी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत विशिष्ट क्रमांक नंबर १६०१२३६९७५ च्या आधारे आधार प्रमाणीकरण यशस्वी झालेले आहे. योजनेच्या निकषानुसार लाभ रक्कम आपल्या कर्जखात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे."  असा मेसेज भागवत यांना त्यांच्या बाईलवर प्राप्त झाला आहे. प्रत्यक्षात मात्र खात्यावर पैसे आले नाहीत. आणि बँकही थांबायला तयार नाही.

पैसे रिपेमेंट होतील 

याप्रकरणी 'MBP Live24'ने क कॅनरा बँकेचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की संबंधित अंबादास भागवत हे आमचे खातेधारक असून चार वर्षांपासून कर्ज थकबाकीदार आहेत. सध्या मार्च एंडिंग सुरु आहे. त्यामुळे आमच्या वरिष्ठ शाखेकडून डायरेक्त्त थकबाकीदारांची वसुलीसाठी कारवाई सुरु आहे. 

त्यानुसार त्यांच्या खात्यातून पैसे कर्जखात्यात वर्ग करण्यात आले आहेत. पैसे परत मिळण्यासाठी त्यांनी आमच्याकडे अर्ज केला आहे. त्यानुसार, त्यांचे पैसे 'रिपेमेंट' करण्यासाठी वरिष्ठ शाखेकडे पाठपुरावा केला आहे. शुक्रवारपर्यंत त्याची प्रोसेस होईल. - राजू पवार, मॅनेजर, कॅनरा बँक, समसूद एरंडगाव, शेवगाव

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !